Description
भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राध्दाचे फल इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे. काही लोक भरणी श्राद्ध पित्या इत्यादीकांच्या मरणोत्तर पहिल्या वर्षी मात्र करतात. दुसर्या इत्यादी वर्षी करीत नाहीत.याविषयी मूळ निर्णय शोधला पाहिजे.जो पर्यंत एक वर्ष पूर्ण झाले नाही तोपर्यंत दैव अथवा पित्र्य कर्म करु नये. इत्यादी वचनावरुन दर्शादि सर्व श्राद्धांचा पहिल्या वर्षी निषेध आहे. त्यामुळे शास्त्रानुसार वर्ष श्राद्धाच्या अगोदर भरणी श्राद्ध करु नये, याकरिता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृत्व प्राप्त होते.म्हणुन दुसर्या इत्यादी वर्षीच भरणी श्राद्ध करणे योग्य आहे असे मला वाटते. पित्याहुन भिन्न जो जो कोणी मरण पावतो त्यांचे भरणी श्राद्ध पहिल्या वर्षी करतात त्या विषयी काय आधार आहे तो मला समजत नाही. पण ती सध्या रुढी पडली आहे.गया श्राद्धाचे फळाच्या इच्छेने आचाराला अनुसरून करावयाचे असेल तर मृत व्यक्तीच्या एकच त्रयीच्या उद्देशाने पार्वण करुन.या श्राद्धामध्ये पिंडदान करण्याचा आचार आहे तोही चित्र आहे . काहीजणांचा निर्णय असा आहे कि पूर्ण मासिक श्राद्ध झाले असेल तर भरणी श्राद्ध करतात असापण निर्णय आहे असं म्हणतात
Reviews
There are no reviews yet.