Description
देव, ऋषी, पितर यांना जलांजली (उदक) देऊन तृप्त करणे, म्हणजे तर्पण होय. ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो. ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे), अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात आणि ती त्या त्या प्रसंगी करायची असतात.
तर्पण करण्याची पद्धत
१. ‘तर्पण नदीवर करावे’, असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे.
२. देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन अन् पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते.
३. ‘देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने आणि पितरांचे अपसव्याने करावे’, असे शास्त्र आहे.
४. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मूळावरून आणि अग्रावरून पितरांचे तर्पण करावे.
५. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मूळांतून ऋषींना आणि तर्जनी अन् अंगठा यांचा मध्यभाग यांतून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे).
६. देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन आणि पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे.
Reviews
There are no reviews yet.